Friday, February 19, 2010

Celebrate this Holi with Ayurvedic Colors ;


Lets mark the begining and turn to the eco friendly culture of INDIA


With the winter mists melting in the sunshine, Phalgun brings new life to every leaf and bud, announcing that Vasant Ritu or springtime has come with its great display of flowers and fruits. While nature wears verdant new robes, the vernal equinox brings hope to farmers. This joyful new beginning is celebrated on the full moon day of Phalgun at the most colourful festival of India – Holi.

Colour or gulal is invariably associated with holi. We don’t exactly know when this tradition of playing with colours on Holi started. Indians have played Holi for many centuries. Ancient scriptures like the Rig-Veda and the Gaduda Purana mention this ritual of people sprinkling colours on each other.
They played with gulal - powder made out of spring blossoms, leaf and fruit extracts. The red was Raktachandan (Pterocarpus santali-nus); the green was blended Mehendi and the yellow was dried Amaltas (Cassia fistula) and Marigold / Gainda (Tagetus erecta).

The Vedas suggested use of the colour of the palash (teshu or dhak) flower. This tree is also called 'the flame of the forest'. The flowers are bright red in colour and they used to be collected from the trees and spread out on mats, to dry in the sun. Once dried, they were then ground to a fine powder. This powder was then mixed with water to give a beautiful saffron-red colour. If clothes soaked in this colour are worn, the colour enters the pores of the skin providing protection from contagious diseases. It has miraculous medicinal effects. Earlier, young princes leaving for their Guru's Ashram used to carry a Palash Danad (stick). It is believed that the stick protected them from diseases and harmful viruses. Palash flowers and tree bark cure many skin diseases. If a pregnant woman consumes Palash flower juice, the child is bound to be immune to many skin and viral diseases.
It is said that Krishna made a concoction of these flowers and used it to shower the gopis with colour. This tradition continues even today. The gesture of throwing colours over each other (in many Krishna temples, even the idols are given a bath or sprinkling of colour) is a joyous celebration of the rejuvenation of nature and renewed hope of happiness and peaceful co-existence.
The playful throwing of colored powder has a medicinal significance too. The spring season, during which the weather changes, is believed to cause viral fever and cold. The colours are
traditionally made of Neem, Kumkum, Haldi, Bilva, and other medicinal herbs prescribed by Ayurvedic doctors.
We still play with gulal. But now the colours come from chemicals. The red is mercury sulphite; the green, copper sulphate; and the black paste has lead oxide. That is not all. Several dry colours use asbestos talc, chalk powder or silica as their base.
Unlike most Indian festivals, Holi has transcended the religious observances associated with it, and all of India cuts loose for a day of mirthful abandon. It is indeed a festival of joy and merriment, celebrated as both Man and Nature cast off their winter gloom. Holi heralds the arrival of spring - the season of hope and new beginnings and the rekindling of the spirit of life.

Wednesday, February 17, 2010

जिव्हाग्री टेकलें कवींठ


शिवरात्री : कवठाची गोडी अविट करणारा सण
----
नाशिक, ता. 11 : कवीठ किंवा कौठ या फळाचे आणि महाशिवरात्रीचे घनिष्ट नाते आहे. कवठाच्या प्रत्येक बीमधून शिवऽ शिवऽ ऐकु येते म्हणून कवठाचे सेवन केल्याने भाविक शिवमय होऊन जातात अशी मान्यता असल्याने हिंदूंमध्ये घराघरात कवठाचे पदार्थ खास शिवरात्रीला तयार केले जातात. कवठाची मिरची-कोथिंबीर कुटून केलेली चटणी तर अविट, पण चुरलेल्या गुळासोबत कवठाचा गर म्हणजे त्याचा स्वाद काय वर्णावा. गेल्या काही दिवसांपासून शेतांमधली कवठाची झाडे भरगच्च फळांनी लगडली आहेत. शिवरात्रीच्या बेताला ती पक्व होतील, अशा बेताने बळीराजाने ती गवतामध्ये पिकण्यासाठी दडपून ठेवली आहेत.

कैंसें एकचि केवढें पसरलें। त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकलें ।।
जैसें कां कवींठ घातलें। वडवानळीं।।
(एकच मुख-कसे व केवढे पसरले आहे? ज्या प्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्हींही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.) भारतीय संस्कृतीमध्ये वनमहात्मय धार्मिक आणि तात्त्विक विचारसरणीमध्ये जोपासले आहे. श्‍लोक 30मध्ये ज्ञानेश्‍वर माऊंलींनी सर्वव्यापी श्रीकृष्णाची तुलना करताना कवठाच्या अविट गोडीची महत्ती सांगितली आहे.
संस्कृतमध्ये कपित्थ, हिंदीत कैथा किंवा कैथ बेल, बंगालीत कोंथ बेल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कवठाला इंग्रजीत वुड ऍपल म्हणतात. तसे त्यांच्यात बऱ्याच फळांना आकार, रंगानुरूप बेरी किंवा ऍपल हे विशेषण चिकटवले तरी झाले. एलिफंड ऍपल हे नाव मात्र हत्तींना प्रिय फळ म्हणून किंवा मंकी फ्रुट - माकडांना प्रिय म्हणून पडले असावे.

बहुगीणी
हे फळ मुलत: भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व इतर दक्षिण आशियाई राष्ट्रात प्रामुख्याने आढळते. पाश्‍चात्य देशात नैसर्गिक पेयामध्ये स्वाद वाढविण्यासाठी याचा वापर केला जातो. कवठापासून जॅम, जेली सुद्धा बनवतात. काही जण निरेची साखर व कवठाच्या गरातील तंतुंचा वापर करून उत्तम प्रतचे शरबत बनवतात, परंतू कवठाचे अखंड झाड हे बुगुणी आहे. कवठाचे लाकूड हे मजबुत व टिकाऊ असल्याने त्यांचा बांधकामात वापर होतो, त्याच प्रमाणे लाकडी मॉडेल्स बनविण्याकरिता त्याचा उपयोग होतो. त्याच्यावर नक्षीकामसुद्धा चांगल्या पद्धतीने होते. शेतीची अवजारा, फुटपट्ट्या, व यंत्राती भाग त्यापासून बनविले जातात.
पावसाळ्यापश्‍चात या झाडातून पांढरा डिंक निघतो, त्यापासून जलरंग, शाई, कपड्यांचे रंग, वॉर्निश तयार केले जाताता.
जुन्या काळी कवठाचा डिंक व चुना एकत्र करून क्रुत्रीम जलस्त्रोतांचे वॉटरप्रुफिंग केले जायचे असा उल्लेख जुन्या ग्रंथात आढळतो. जुन्या काळी तैलचित्रांचे संवर्धन करण्यासाठी या झाडाचा डिंग वापरला जायचा. तर गृहीणी या झाडापासून फेसाळणारा द्रव बनवून त्याचा वस्त्र स्वच्छ करण्यासाठी वापर करायच्या.
आरोग्यवर्धक
यजुर्वेदात कवठाचा उल्लेक आढळतो. चरक संहितेत शरीराच्या विविध व्याधींवर कंवठाचे उपयोग सांगितले आहे. पित्ताशय, अपचन, वायुविकारात कवठाचा मोठा लाभ सांगितला आहे. त्यासाठी कोवळा पाला दुध-साखर एकत्रकरून दिला जातो. आयुर्वेदशास्त्रात काळीज व हृदयाच्या आजारात हे लाभकारी मानले जाते. अतिसार व पोटाच्या विकारात कच्चे कौठ दिले जाते. ग्रामीण भागात सर्प, विंचू किंवा किटक चावल्यास झाडाची साल, फळाचा गर चावून त्याचा चोथा लावण्याची प्रथा आहे.
---

Wednesday, January 27, 2010

इतिहासाची पुनरावृत्ती;

उत्साह वाढवताहेत बक्षिसे...अन्‌ शुभेच्छा!




ध्यानी मनी नसताना एखादी घटना घडते..."तुम्हाला राजीमाना द्यावा लागेल'...असे शब्द कानी पडतात...चुक नसताना आलेले हे बालंट नोकरी जाण्याच्या भावनेपेक्षाही जास्त बिकट...असा प्रसंग मी 2009 साली अनुभवला होता...आज त्यात घटनेचा पुढचा अंक...या वेळचा प्रसंगी मात्र सर्वस्वी निराळा...ज्या घटनेमुळे माझी नोकरी जाण्याची पाळी आली होती, त्याच प्रसंगात यंदा मी बक्षिसाचा मानकरी ठरलो.

बिग गन्स नेव्हिगेशन कार रॅलीत मला अनपेक्षीतपणे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले. त्याचे सविस्तर वृत्त रविवार दिनांक 10 जानेवारी, सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये छापुन आले होते.
सोमवारी माझे जुने फोटोग्राफर मित्र सचिन निरंतर यांचा अभिनंदनाचा फोन - तुला तिसरा व पाचवा क्रमांक मिळाला आहे. मला वाटले कार रॅलीत तिसरे बक्षिस मिळाल्याच्या बातमीबद्दल तो अभिनंदन करतोय! मी म्हटले, मित्रा मला तिसरा क्रमांक मिळाला आहे. एका वेळेस एकच बक्षिस मिळते. तो म्हणाला नाही दोन बक्षिसे आहेत व मला (म्हणजे त्याला) द्वितीय, तर दैनिक सामनाचे भूषण पाटील यांना प्रथम बक्षिस मिळाले आहे. लगेच ट्युब पेटली - हा तर स्पोर्टस्‌क्राफ्टच्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल.
मागच्या वर्षी या इव्हेटच्या प्रॅक्‍टीसराऊन्डची बातमी आमच्या दैनिकात मिस झाली होती (त्यात माझा कोणताही रोल नाही). या घटनेवरून काही गैरसमज झाले आणि संपादकांनी व्यवस्थापकांना बोलावून मला काढून टाकण्याचे आदेश दिले. माझ्या चेहऱ्यावर कमालीचा निर्विकारपणा होता - हे काय चालले आहे? पश्‍चाताप नव्हताच. मी चुक केली नाही, तर पश्‍चाताप का करू, आणि तो माझ्या चेहऱ्यावरून प्रतिबिंबीत तरी कसा होणार? अशी ती अवस्था होती. संपादकांना वाटले मला झाल्या प्रसंगाबद्दल काहीही वाईट वाटले नाही, तर मला वाटत होते, की ज्या सहकाऱ्यावर बातमीची जबाबदारी दिली, त्याने अक्षम्य दुर्लक्ष केले.

सरतेशेवटी माझ्याबद्दलचा तो निर्णय मागे फिरला हा भाग अलाहीदा, परतू म्हणतात ना - हिस्ट्री रिपीट्‌स इटसेल्फ; आज त्याच स्पोर्टस्‌क्राफ्टच्या स्पर्धेने मला दोन बक्षिसे मिळवून दिली आहेत. माझी "एक पुरस्कार विजेता छायाचित्रकार' अशी नविन ओळख या घटनेने करून दिली आहे.

तसे बघितले तर जानेवारी 2010 या वर्षाची सुरूवातच धुमधडाक्‍यात झाली आहे - कोणताही संकल्प सोडलेला नसताना एकापाठोपाठ एक सुखद धक्कादेणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. पहिला धक्का म्हणजे मी एक कॅमेरा विकत घेतला. अनेक छंद करून झालेत, परंतू स्टिल फोटोग्राफी ही केवळ दुसऱ्यांच्या कॅमेऱ्यातूनच करण्याचे योग येत होते. त्यातही प्रोफेशनल कॅमरा हाताळण्याची फारशी संधी मिळाली नाही. डिजीटल क्रांतीतील ऍमॅच्युअर कॅमेरे व ऑटोमोडच्या बळावर काही प्रेक्षणीय छायाचित्रे जरूर टिपलीत, पण त्याचे श्रेय हे सह्यगिरीतील भ्रमंतीलाच अधिक. कारण अशी अफलतून दृष्य एरवी बघायला मिळत नाहीत.

काही जुन्या फोटोग्राफर मित्रांसोबत परंतू वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनच्या राष्ट्रीय कार रॅली अजिंक्‍यपदाचे वार्तांकन करताना सतत टाकतो, तसा खडा टाकुन दिला, "तुमच्या पैकी जर कोणाला तुमचा कॅमेरा विकायचा असेल तर मला कळवा, मी त्यावर विचार करीन'. या प्रश्‍नावर नेहमी प्रमाणे आम्ही आमचा कॅमेरा आत्ताच दिला, अगोदर सांगायला हवे होते' हे उत्तर मिळाले.
खरे तर अगोदर सांगणार कसे, जो भेटेल त्याला सांगत होतो. आता स्वत:चा कॅमेरा हवा असे मनोमन वाटत होते. मनातील घुसमट व्यक्त करण्याचे ते एक सुंदर व्यासपिठ असल्याचे मी नम्रताला सांगत होतो. माझे शुन्यात हरविणारे डोळे बघुन तिनेही होकार दिला होता. परंतू पाच ते दहा हजारापेक्षा जास्त बजेट अफोर्ड करू शकणार नाही, हे स्पष्ट होते. मित्रवर्य सचिन पाचोरकरांनी एक लेटेस्ट सेमी प्रो कॅमेरा बघिला, परतू त्याची किंमत 22000 होती, त्यामुळे ते सुद्धा एक दुरचेच स्वप्न वाटत होते. जी काही कमाई होते, ती सर्व दैनंदिन खर्च व त्यातून जे काही शिल्लक राहील, त्यातून हॅन्डीक्राफ्टचा उद्योग उभा करणे याकरिता खर्ची होत होती.
अखेर प्रविण पगारेंनी कॅननचा "मार्क 5 डी' घेतला व आपला कॅमेरा विकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रोफेशनल "400 डी - डिजीटल रिबल एक्‍सटीआय' अशा पद्धतीने माझ्याकडे आला. हा एक मोठ्ठाच धक्का. मित्र अभिलाष बोटेकरने पाच हजाराची तातडीची मदत केली. पुस्तकाचे एक काम आल्याने वरचे साडे आठ हजार महिन्याभरात फेडणे शक्‍य होणार होते.
डिसेंबर महिन्यात स्पोर्टस्‌क्राफ्टची रॅली होती. कार्यालयात फोन करून इव्हेंट कव्हर करण्यास सांगितले. मागिल वर्षाचा अनूभव सर्वांना ठाऊक होताच, परंतू बातमी व छायाचित्रासाठी माणूस नसल्याने मला तातडीने पाचारण करण्यात आले. अशा पद्धतीने आदल्या वर्षी माझ्या मुळावर उठलेला इव्हेंट कव्हर करण्याची जबाबदारी माझ्या शिरावर येऊन पडली. कॅमेरा येऊन आठवडाही झाला नव्हता, तरी पण मला फोटोग्राफीचा गंध नसल्याने मी सचिन निरंतर यांना दरोज फोटो देत जा! अशी विंनंती केली.
मी 1996-97 पासून नाशिक परिसरात वेगवेगळे मोटर स्पोर्टस्‌ इव्हेंट पत्रकार म्हणून कव्हर केले आहेत, त्यातही काही राष्ट्रीेय इव्हेंटचा पीआरओ होतो. भारतातील नामांकीत छायाचित्रकारांचे काम याची देही याची डोळा बघितले आहे. तो अनुभव आणि माझ्या कॅमेऱ्याच्या बेसिक लेन्सच्या मर्यादेत राहून यथेच्छ फोटोग्राफी केली. या स्पर्धेच्या वेळी विविध कॅटॅगरीत अडीच हजारापर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली होती व नाशिकचे जवळ पास सर्व अनुभवी प्रेस फोटोग्राफर्स हजर होते.


बिग गन्स...शॉट गन
नाशिकमध्ये वेस्टर्न इंडिया स्पोर्टस्‌ असोसिएशनने आपल्या दशकपूर्ती वर्षारंभानिमीत्त नेव्हिगेशन कार रॅलीचे आयोजन केले होते. रॅली फक्त विसाच्या सदस्यांसाठीच होती, त्यामुळे जवळपास सर्वच स्पर्धक मातब्बर. "तुम्ही इतकी वर्षे विसा सोबत आहात, तर तुम्ही सुद्धा भाग घ्या', असे विसाचे अध्यक्ष अश्‍विन पंडित यांनी सांगितले. मला व दीपक ओढेकर यांना त्यामुळे संधी मिळाली. आम्ही दोघे सोडून, बाकी सर्वच मोटरस्पोर्टस्‌च्या खेळातील निष्णात. भलीमोठ्ठी प्रवेश फी आणि कोणताही पूर्वानूभव नाही, त्यामुळे स्पर्धेत नेव्हिगेटरची अवघड भूमीका पार पाडायची की नाही, या विषयी मनामध्ये साशंकता होती. ओढेकरांना कार्यबाहुल्यामुळे जमले नाही, मी सहभाग घेतला.
स्पर्धेचा एक नियम होता, ड्रायव्हर व नेव्हिगेटरच्या जोड्या या चिठ्ठी पद्धतीने ठरणार आणि रोड बुक स्पर्धा सुरू झाल्यानंतरच हातात मिळणार. आदल्या दिवशी ड्रायव्हर्स ब्रिफींगच्या वेळी अश्‍विन पंडितांनी कुशलतेने काही मुलभुत टिप्स दिल्या.

मातब्बर स्पर्धकांच्या उपस्थितीत शनिवारी विसाची "बिग गन्स कार रॅली' पार पडली. पहिल्यांदाच पोहण्याचा सराव करण्यासाठी पाण्यात उतरावे, तसा पहिल्या शंभर मीटर्सचा अनूभव होता. गाडीचे ओडोमीटर शुन्यावर सेट न करताच आम्ही स्टार्ट घेतला, इथेच पंडितांनी दिलेल्या मुलभूत सुचनांपैकी पहिल्या सुचनेकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतरचा प्रत्येक सेकंद माझ्याकरिता पाण्यात गटांगळ्याखाण्यासारखा होता. माझा ड्रायव्हर संजय खत्री हा निष्णात असल्याने अगदी बेफिकीर नसला तरी निश्‍चींत वाटत होता. प्रश्‍न होता, तो दोघांचे ट्युनिंग जमण्याचा. ते जेपर्यंत पहिली वेळनियंत्रक चौकी (टीसी पॉईंट) जवळ जवळ चुकली होती.

मी रस्त्याचे दिशादर्शन बिनचुक ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, तर पप्पु खत्री फक्त किलो मीटर्स मॅच होताहेत की नाही, यावर व पुढचे ट्युलीप जुळतेय की नाही यावर लक्ष ठेवत होता. वेळ आणि वेगाचे गणित करायला फुरसतच नव्हती. रस्ता चुकतोय असे लक्षात आल्यानंतर दोनदा मागे फिरून झिरो सेट केला, त्यात बहुमुल्य वेळ वाया गेला. पप्पु खत्री निश्‍चींत, पण गंभीर वाटत होता. नंतर मात्र आमचे टुनिंग छान जमु लागले.
दादासाहेब फाळके स्मारकापाशी स्पर्धेचा 81वा किलो मीटर पार केला तेव्हा आम्हाला कळून चुकले की, सगळे स्पर्धक बरोबर वेळेत दाखल झाले व दोन वगळता सगळ्यांनी सगळे टीसी, पीसी घेतले, त्यामुळे आपली स्पर्धा ही सहाव्या, सातव्या क्रमांकासाठी असेल.

संध्याकाळी साई-साया हॉटेलात बक्षिस वितरणासाठी हजेरी लावली. प्राथमिक निकाल बाहेर आला, त्यावेळी आम्ही चक्क चवथा क्रमांक पटकावला होता. पण अंतिम निकाल बाहेर आला आणि आश्‍चर्य घडले. आम्हाला चक्क तिसरा नंबर मिळाला होता. एअरटेल वन इंडिया रॅलीत पंचवीस लाखाच्या बक्षिसापर्यंत पोहाचेलेले अश्‍विन पंडित अनंत अडचणींना तोंड देत दुसऱ्या क्रमांकावर होते, तर गिरीश देवस्थळींच्या जोडीने जेतेपदाची बाजी मारली होती.
...अशा प्रकारे 2010ची सुरूवात धडाकेबाज झाली आहे. आणखी एक भव्य दिव्य, लाईफटाईम इव्हेंट थोडा पुढे ढकलला तो म्हणजे कोकण कडा रॅपलींग. अन्यथा माझ्यासाठी ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌ फिल्डमध्ये हा ट्रिपल क्राऊन ठरला असता. अर्थात हा इव्हेंट होईल, तेव्हा मी त्यात सहभाग नक्की घेइन.

- प्रशांत परदेशी

Thursday, December 31, 2009

कृपया हे कधीही करू नका




Always Face to the ROCK
Nashik, 30 December 2009 :

"आपण निसर्ग यात्री आहोत', "इतिहासाचे आपल्याला ज्ञान आहे', "आपल्या महान संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे', असा समज जर कोणाच्या मनात निर्माण होत असेल तर त्यात काहीही गैर नाही, परंतू याचा गिरीभ्रमणाशी संबंध येतो कुठे? नेमके हेच न समजल्याने नाशिकच्या गुलालवाडी व्यायाम शाळेने चक्क किल्ले हरीहर गडावर एक "पिकनीक' काढली होती.
योगायोग म्हणजे आम्ही आमच्या दुचाकींवर भल्यासकाळी नाशिकहून हरिहर गडावर पाण्याचे एक टाके स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आलो होतो. आम्हाला वाटले की ट्रेकर्सचा गट रात्री मुक्कामी असावा व तेच गड उतरताहेत. पण निट बघितल्यानंतर हे ट्रेकर्स नाहीत हे लांबुनच लक्षात आले. सर्व जण पायऱ्या व खडकांकडे पाठ करून आपल्या बॅगा सावरत उतरत होते. जवळ आल्यानंतर माहिती घेतली तेव्हा पहाटे पाचला येथे दाखल झालो होतो, असे उत्तर मिळाले. सहभागी प्रमुख्याने लहान मुले, युवक व काही मध्यमवयीन महिला होत्या व त्यांचा एक उत्तरवयीन ग्रुप लिडर होता.

डोंगराचे काही नियम असतात, त्याठिकाणी छोटासा अपघातही परवडण्यासारखा नसतो. परंतू गुलालवाडीच्या या गटाला ट्रेक व पिकनिक यात कोणताही फरक ठाऊक नव्हता. गट प्रमुख एकच सांगत होते, या (म्हणजे लहान किंवा अज्ञानात राहणाऱ्या) पिढीला आपण काही तरी द्यायचे या उद्देशाने इथे घेऊन आलो आहोत. गट-कोटावर शहरी माणसाने वावरणे व ग्रामीण-आदीवासींनी वावरणे यात पुष्कळ फरक आहे. अंगभूत ताकद, खडतर आयुष्य जगण्याची सवय आणि चढ-उताराच्या टेरेनशी एकरूप झालेली ही माणसे सहजपणे वावरताना दिसतात. शहरी माणुस त्यांच्यासारखा स्वच्छंदीपणे वावरायला लागला तर त्यांचे भयंकर परिणाम घडू शकतात. असे नाही की शहरी माणसात कमी ताकद असते, किंवा त्यांची पावले निसरड्या वाटेवर ग्रीप घेऊ शकत नाही. परंतू सवय नसलेला शहरी माणूस निसटून डोंगर-दऱ्यात एक दोन नव्हे, अनेक अपघात झाले आहेत. पाठीवर सॅक असेल तर कधीही खडकाकडे तोंड करून डोंगर-कपारी, किंवा लहानात लहान दरी उतरण्याचा प्रघात आहे.
गुलालवाडी व्यायाम शाळेने अशा अवघड किल्ल्यावर पिकनिक काढताना मुलांना व महिलांना सुरक्षितपणे उतरविण्याची कोणतीही काळजी घेतली नव्हती. सरते शेवटी सर्व जण सुखरूप उतरले. (ज्या अर्थी दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात कुठल्याही दुर्घटनेचे वृत्त छापून आले नाही) परंतू ही मंडळी या मोहिमेचा काय अनूभव घेऊन जाणार! गड-किल्ल्यांवर जाणे खडतर, जीवघेणे असते? गडाच्या अवघड, सरळसोट, निसरड्या, मोडकळलेल्या पायऱ्या समोर तोंड करून उतरा? अशा चुकीच्या संकल्पना मनात रूजणे धोकादायक.

गड-किल्ल्यांवर फिरायला जाताना अनुभवी मंडळींच्या मार्गदर्शनाखालीच मोहिमा करणे इष्ट आहे. मागे काही डॉक्‍टर मंडळींनी एक क्‍लब काढून गडांवर भन्नाट वेगात फिरण्याचा सपाटा लावला होता. जणू क्रॉस कंट्री शर्यतीत सहभाग घेतल्यागत ही मंडळी अवघ्या काही तासात गड फिरून यायची. सुरूवातीला काही घडले नाही, परंतु वेगात चालल्याने व अवघड जागी कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय चढल्याने काही मंडळीं घसरून पडली. दैव बलवत्तर म्हणून कोणाचा जीव गेला नाही, परंतू मग या घटनांनी खच्चीकरण होऊन या मंडळींनी गडांकडे जाणे कमी करून टाकले. त्या ऐवजी अनूभवी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हा छंद जोपासला असता, तर आरामात एकेक मोहिम पारपडली असती, शिवाय आपल्या सोबतच्या कॅमेऱ्यातून सह्याद्रीच्या विविध छटा एव्हाना त्यांच्या संचात सामील झाल्या असत्या.

Tuesday, November 24, 2009

लेण्या बोलुन उठल्या...



नाशिक : असं म्हणतात की एक छायाचित्र हजार शब्दांचं काम करू शकतं! पण हजारो वर्षांचा नामशेष होत जाणारा ठेवा उत्तमरित्या कॅमेराबंद झाला, तर त्याला काय म्हणावे? अमुल्य जतन? नाशिकचे छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या छायाचित्राचे प्रदर्शन अजिंठ्यात लेणी क्रमांक चार येथे सद्या सुरू आहे.

Wednesday, November 4, 2009

Saturday, September 19, 2009

Catapult Menace claims Rare Birds in Nashik



Nashik, 19 Sept. 09 : बोरगड येथील वन खात्याच्या संवर्धन राखीव वनात घुसून गलोरच्या सहाय्यने दुर्मिळ पक्ष्यांची हत्या करणाऱ्या दोघांना वन खात्याच्या अधीकाऱ्यांनी पकडले असुन त्यांना न्यायालयाने 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बोरगड येथील संरक्षक वनात जंगल रेन बॉबलर, टेलर बर्ड, बुलबुल या सारख्या वन्य पक्षी विहार करीत असतात. या पक्षावर गुजरात मधील घाटवडी येथील राजू सोनु कोगील, लगीन राजीराम धापड या शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली त्यांना गलोरच्या सहाय्यने तेरा पक्षाची निर्घुन हत्या केली. परीसरातील नागरीकांनी पकडुन त्यांनी वन अधीकारी डी.सी. चौधरी, के.एम अहिरे यांच्या ताब्यात दिले. त्यांना आज न्यायालयात उभे केले असता देन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली त्यांचे दोन साथीदार पळून गेले असून त्यांच्या शोधासाठी एक पथक गुजरातला जात आहे. या गुन्हयात आरोपीला सहा वर्ष शिक्षा होऊ शकते. गलोरच्या सहाय्याने होणाऱ्या पक्षी हत्येचा गुन्हा प्रथमच दाखल झाला आहे.

Friday, December 12, 2008

सर्वात अवघड बाजुने धोडप सुळका सर


Dike formation at Dhodap Fort, white spots at the far extreme are of Saptashrungi, Vani.

नाशिकचे गिर्यारोहक : सातमाळ रांगेतील सर्वांत उंच व अवघड मोहीम फत्ते प्रशांत परदेशी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 10 : आपले राकट, पिळदार, पुरुषी सौंदर्य ल्यालेल्या सातमाळ रांगेतील सर्वांत उंच अशा धोडप गडावरील पाचशे फूट उंचीचा सुळका नाशिकच्या दोन गिर्यारोहकांनी सर्वांत अवघड अशा पश्‍चिम बाजूने प्रथमच सर करण्याचा पराक्रम केला. "वैनतेय' संस्थेचे समीरण कोल्हे व सोमदत्त म्हस्कर यांच्या या अलौकिक पराक्रमामुळे महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासात आणखी एक मानाचे पान लिहिले गेले आहे.
धोडंबे (ता. चांदवड) गावाजवळ व्हेल्कॅनिक प्लगची रचना असलेला सुळका व त्यापासून निघालेल्या निरुंद सोंडेच्या डाईक पद्धतीच्या अनोख्या रचनेमुळे आपले वेगळेपण जोपासणारा चार हजार 761 फूट उंचीचा धोडप किल्ला. एका निरुंद माचीवर "एखादा डोंगरच आणून ठेवला असावा' अशा आविर्भावात उभा असलेला निसर्गनिर्मित वास्तुशिल्पाचा हा अप्रतिम आविष्कार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून येता-जाता सहजगत्या दृष्टीस पडतो. या गडावर असलेल्या 500 फूट उंचीच्या सुळक्‍यावर परंपरागतरीत्या पूर्वेकडून चढाई होते. महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाचा प्रमुख ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या "सांगाती सह्याद्रीचा' या हृषीकेश यादव यांनी संपादित केलेल्या ग्रंथात धोडप सुळक्‍यावर पूर्व दिशेने चढाईचा मार्ग दर्शविण्यात आला आहे. या बाजूने हा सुळका सोप्या श्रेणीत गळला जातो.
"वैनतेय'च्या गिर्यारोहकांनी सर्वांत अवघड अशा पश्‍चिम बाजूने शनिवारी (ता. 6) साडेचार तासांत चढाई करून एक नवा मार्ग खुला केला. समीरण कोल्हे या धाडसी गिर्यारोहकाने छत्रपती शिवाजी महाराज व सप्तशृंगी देवीचे नामस्मरण करून सकाळी आठला चढाईस सुरवात केली. दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी समीरण सर्वांत प्रथम शिखरावर पोचला व त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच व नव्या मार्गावरची मोहीम फत्ते झाली. पाठोपाठ सोमदत्त म्हस्कर हा झुमारिंग करीत वर दाखल झाला आणि "वैनतेय'च्या दोन गिर्यारोहकांनी अत्यंत अवघड अशा बाजूने धोडप सुळका सर केला.
पंधराच दिवसांपूर्वी रायगडावरील लिंगाणा सुळका 24 तासांच्या चढाईत सर केल्याने धोडप सुळक्‍यावरचा नवा मार्ग उघडण्यात यश येणार, असा आत्मविश्‍वास होता. सुदैवाने हवामान चांगले असल्याने धोडपची मोहीम फत्ते झाल्याची प्रतिक्रिया सोमदत्त याने "सकाळ'शी बोलताना दिली.
आजमितीला नाशिकचा सर्वांत गुणी गिर्यारोहक म्हणून मान्यता असलेल्या समीरणने सांगितले, की तीन वर्षांपूर्वी "वैनतेय'च्या एका रात्री पदभ्रमण मोहिमेचे नेतृत्व केले. तेव्हा टिपूर चांदण्यात धोडपची भिंत खुणावत होती. त्यानंतर किल्ल्यावर दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये पश्‍चिम बाजूने चढाईचा अभ्यास करण्यात आला होता. प्रत्यक्ष आरोहणात फारसे अडथळे आले नाहीत. परंतु, सरळसोट चढाई असल्याने पायाचा चवढा मावेल इतक्‍या चिऱ्यांवर आधार घेत चढाई केली. विशेष म्हणजे संपूर्ण चढाईत केवळ दोन ठिकाणी प्रसरणात्मक खिळ्यांचा (बोल्ट) वापर करून किल्ल्याच्या दगडाची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. या आरोहण मोहिमेची माहिती आता महाराष्ट्र सेवा संघ संचालित "गिरीमित्र संमेलन' समितीकडे देण्यात येईल. त्यानंतर धोडप सुळका पश्‍चिम बाजूने सर झाल्याच्या विक्रमास अधिकृत मान्यता मिळेल.
---
नऊ तोफांचे शल्य
धोडप सुळक्‍याच्या पश्‍चिम बाजूला प्रचंड वारे व पावसामुळे झीज झाल्याने काही अजस्त्र बोल्डर्स कोणत्याही क्षणी सुटण्याच्या बेतात आहेत. किल्ल्याच्या पाच तटबंद माच्यांची अवस्था बिकट असून, सर्वच माच्यांचे दगड सुटू लागले आहेत. गडावर काही वर्षांपूर्वी सेनादलाच्या अधिकाऱ्यांनी नऊच्या नऊ तोफा बेदरकारपणे वरून ढकलून देवळाली कॅम्प येथे नेल्याने गडाच्या सौंदर्यात गालबोट लागल्याचे शल्य हट्टीच्या गावकऱ्यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केले.

Friday, December 5, 2008

दृष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी



शरीर नव्हे, मनं चिंब भिजवून टाकणाऱ्या या जलप्रपाताची आज खरी आठवण होत आहे!
मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले, त्याच्या जखमा, इमारती, हॉटेल,
इस्पितळ, रेल्वे स्थानकांपेक्षा मनावर अधिक आहेत.
मृत्यूचं ते एक तांडव होतं!

आणि माहितीच्या विस्फोटामुळे दुरचित्रवाणी, नभोवाणी, इ.)
हे तांडव सद्या दरोजच (इच्छा नसतानाही) पाहावे लागत आहे.
दूरचित्रवाणीवरच्या बातम्यांचा मारा हा अनावश्‍यक व अती होत आहे.
नुसत्या बातम्याच नव्हे, या बातम्या नाटकी पणे सादर केल्या जातात,
बातम्यांच्या सोबत दिला जाणारा आवाज (व्हॉईस ओव्हर) स्वाभाविक
नसुन त्याच्यात मुद्दाम नाटकीयता ओतली जाते; इतकेच नव्हे बातम्यां
सोबत दिले जाणारे संगीत कर्कश: व मन:विचलीत करणारे आहे.

या दृष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी मी शरीर थकविणाऱ्या, पण
मनाला कमालीचा तजेला आणणाऱ्या दुर्ग धोडप भ्रमंतीवर शनिवारी जात आहे.
...चला तर मग भेटूया किल्ले धोडपची सैर करून आल्यानंतर.
(काही चांगले स्नॅप्स जरूर शेअर करू)

Friday, November 28, 2008

Who’s fault is this!



- Blood stained CST railway station of Mumbai : the horrific site after Pak or Pok sponspred terrorist opened indiscriminate fire on 27 November.

Sea of Lensmen near the Taj Heritage hotel



- Sea of Lensmen near the Taj Heritage hotel await to catch the critical movements of terrorist seizer of foreign tourist.

Saturday, September 13, 2008

हळदीच्या ताटव्यात सोनेरी मंडुक


नाशिकमध्ये आढळले दुर्मिळ बेडूक

प्रशांत परदेशी

नाशिक, ता. 21 : बसगड-उतवड परिसरात "वैनतेय' गिर्यारोहण, गिरिभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांना नुकतेच पिवळ्या, सोनेरी रंगाच्या दुर्मिळ बेडकीचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यात जंगलांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट झाली. दुर्गम भागात काही ठिकाणी अजूनही दाट झाडी टिकून आहे. त्यापैकीच एक म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील बसगड व उतवडचा परिसर. रानवाटा तुडविण्याचा छंद असलेली मंडळी या गडांच्या वाटेला फारशी जात नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे या गडांचा इतिहास उपलब्ध नाही. त्यावर मुक्कामाची सोय नाही, की पाण्याचे प्राचीन किंवा नैसर्गिक तलाव नाहीत.
जव्हार व घोटी-इगतपुरीकडील आदिवासीबांधव पायी ये-जा करण्यासाठी निरगुडपाडा, कळमुस्ते, जांभुळपाडा, शेरीचा पाडा, काचुर्ली या मार्गांचा वापर करत असले तरी उतवडकडे सहसा पायपीट होत नाही. त्यामुळे उतवडच्या बाजूला माणसांची ये-जा कमी असल्याने त्याठिकाणी अनेक जैवविविधता काही प्रमाणात टिकून आहे. "वैनतेय'च्या मोहिमेदरम्यान या गोष्टीची प्रचीती आली.
दोन किल्ल्यांची खिंड ओलांडून हळदीच्या ताटव्यातून जाताना बसगडच्या दरीत हळदीच्या पानावर सोनेरी-पिवळ्या रंगाच्या दुर्मिळ बेडकीचे दर्शन घडल्याने मोहिमेत सहभागींचा आनंद गगनात मावेनासा झाला. या बेडकीच्या पायांच्या रचनेवरून ती झाड व पानांवर अधिक राहत असावी. छायाचित्र टिपताना बेडकी निर्धास्तपणे बसून होती, नंतर धोक्‍याची चाहूल लागल्याने तिने आपले शरीर फुगवून दाखविले.
सुमारे दहा मिनिटे बेडकीचे दर्शन घेतल्यानंतर मोहिमेतील कार्यकर्त्यांनी तिला तिच्या नैसर्गिक ठिकाणी तसेच सोडून पुढचा रस्ता धरला.
यंदा श्रावणात आषाढधारा धरल्याने बसगड व उतवड परिसरात नद्या, नाले भरभरून वाहत आहेत. अनेक प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर फुलला असून, आदिवासी बांधवांनी पेरणी केलेली भात, नागली, वरईची पिके चांगली रुजल्याचे चित्र दिसत आहे.

Friday, September 12, 2008

...काही प्रश्‍न


"स्टार माझा'च्या चमुवर झालेल्या हल्ल्याचा तिव्रपणे निषेध करण्यापूर्वी काही प्रश्‍न माझ्या मनात सारखा घोळत आहे:
1. पत्रकारीता या पेशाला समाजात मान-सन्मान आहे, तसा त्यांचा वचकही आहे.
जबाबदार व्यक्ती( अधिकारी, नेते, उद्योजक, कलावंत) तर मिडीयाचा सन्मान करायला चुकत नाहीत; व्यक्तीश: ते कितीही चुकत असले तरीही!
मोठ्या ब्रॅन्डचा मिडीया असेल तर काही त्रासच नाही, सर्व काही आलबेल.
अगदी व्हीआयपी ट्रिटमेंट.
लाल पायघड्या पांघरून स्वागतच!

- हा समज नाशिकमध्ये सचिन अहिरराव व आता नितीन भालेराव यांच्यावरील हल्ल्याने खोटा ठरवला आहे.
- माझ्या मते हा समज खोटा होताच, परंतू अनेकांच्या मनात पत्रकारितेचे जे चित्र उभे आहे, ती धारणा फसवी असल्याची ही दोन ठळक उदाहरणे.
2. पत्रकारांवर किंवा पत्रकारीतेवर हल्ला होण्याची काय ही पहिलीच वेळ आहे?
- नाही! तळमळीने ही सेवा करणाऱ्यांवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. भविष्यातही होत राहणार! यात शंका नाही?
स्तुती केलेले, कौतुक केलेले कुणाला आवडणार नाही? एखादा शब्द विरोधात गेला तर मात्र "मिडीया खराब'"अमुक प्रतिनिधी' पैसेखाऊ! असे सर्रास आरोप होतात.
3. बजाज फायनान्स प्रकरणात मिडीयाने फक्त घटनेची दखल घेतली होती. त्या घटनेचे वृत्त येण्याच्या आतच असा तुफान हल्ला झाला.
- यावरून एक गोष्टी स्पष्ट होते, ती म्हणजे वसुली करणाऱ्या कंपनीला आपण केलेल्या किंवा आपल्या हातुन घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य कळून चुकले होते. त्यात व्यवसायत: दांडगटपणा, त्यामुळे मिडीयाकडून वस्तुनिष्ठ वृत्त येणार, विरोधातली बातमी येणार, की दोन्ही बाजुंना आपले म्हणणे मांडण्याची संधी देणार, याची वाट पाहण्याच्या आगोदरच मिडीयावर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाला.
4. पोलिसांना क्रॉस कम्पलेनमध्ये किती इंटरेस्ट असतो, हे सर्वश्रृत आहे, परंतू बजाज फायनान्स कर्मचाऱ्यांची आगळीक ढळढळीतपणे स्पष्ट दिसत असतानाही, त्यांनी पत्रकारावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा?
- व्यक्तीश: मला यात आश्‍चर्य वाटले नाही. या सारखे पोलिसांचे व गुंडाचे प्रताप मी व्यक्तीश: बघितले आहेत, आणि अनुभवले सुद्धा आहेत.
5. भालेरावांनी "इन्सिपिरेशन'चा जो मुद्दा उपस्थित केला, त्याने सर्वांनाच विचारात टाकायला हवे.
- पत्रकारांच्या रूपातील द्वारपालाचे मनोधैर्य असल्या गुंडगिरीने खचणार नाही, हे नक्की, पण मेनस्ट्रिमच्या बाहेरही मोठा मिडीया आहे. त्यांची "हाईरारकी', त्यांचे नियम, घटनांचे व आपल्या सहकाऱ्यांचे आकलन ते कोणत्या पद्धतीने करतात? याचा कोणताही ठावठिकाणा नसतो, अशी पत्रकारीतेतील, तिकेच महत्वाचे कार्य बजावणारी सेकंड, थर्ड, फोर्थ बॅच मेनस्ट्रिम मिडीयाच्या प्रतिनिधींवरील हल्ल्यामुळे व त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे बैचेन झाली नाही तरच नवल.
6. हे कायद्याचे, न्यायाचे राज्य आहे, असे सारेच म्हणतात.
- परंतू न्याय मिळत नसेल तर तो मिळवावा लागतो. पत्रकारांची छोटीशी दुनिया मुळातच प्रचंड विखुरलेली. मने सहजासहजी जवळ येत नाहीत. रकाने खरडताना, सण-वार, मित्र-परिवार, घर-दार सगळ्यांवर अन्याय होतो, आणि स्वत:वर बितली तर मग विचारूच नका.
त्यामुळेच "मिडीया ऑफ नासिक युनाईट' ही हाक द्यावीशी वाटते.
- फक्त नाशिकच का? तर आपले प्रश्‍न आपण घेऊन पुढे जाऊ शकतो. समाजाचे प्रश्‍न तर आपण मांडत असतोच. त्यातही प्रामाणिकपणे, तळमळीने काम करणारे स्वत:वर अन्याय झाला, तरी क्षमाशील मनाने थोड्याच कालावधीत झाले, गेले विसरायला लागतात... आणि मधुनच एखादी सचिन अहिरराव, नितीन भालेराव, अरूण दीक्षित घटना घडते.
-त्याकरिता नाशिकच्या मिडीयाने सोशल, सेल्फ इश्‍युज घेऊन महिन्यातून किमान एकदा एकत्र यायला काय हरकत आहे.
- प्रशांत परदेशी, नाशिक.

Wednesday, May 28, 2008

त्र्यंबकच्या डोंगररांगांवरून काळ्याकुट्ट मेघांचा प्रवास

पेगलवाडी : मेघांचे थवेच्या थवे त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांना स्पर्श करून जात आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावरील संडे पिनॅकल, पंचलिंग, दुर्गभांडारचा परिसर सध्या ढगांनी असा व्यापत आहे. (छायाचित्र ः प्रशांत परदेशी)
यंदा लवकर आगमन : हवेत थंडावा, वळवाच्या पावसाची वार्ता

प्रशांत परदेशी ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. 20 : त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांवर रविवारपासून (ता. 18) काळ्याकुट्ट मेघांनी गर्दी केली असून, वेगवान वाऱ्यासह इथल्या डोंगररांगांना स्पर्श करून जाणारे मेघ "वळवाचा पाऊस लवकरच पडणार' अशी जणू वार्ताच देत आहेत. साधारणतः मेच्या मध्यास थरचे वाळवंट कमालीचे तप्त होते, तशी तेथील हवेची पोकळी भरून काढण्यासाठी अरबी समुद्रावरील पाण्याने भरलेल्या ढगांची उत्तर भारताच्या दिशेने आगेकूच सुरू होते.
ढगांचे असे थवेच्या थवे उत्तरेकडे प्रवास सुरू करतील, हिमालयाचे छाताड त्यांना अडवून धरेल, तसे पावसाचे ढग गोळा होऊन भारतीय उपखंडात "वर्षा'चे आगमन होईल.
रविवारी त्र्यंबकेश्‍वर व परिसरातील डोंगररांगांवर जोरदार वारे वाहत होते. दिवसभर या वाऱ्यांबरोबर मेघांचा नेत्रदीपक प्रवास जमिनीवरून न्याहाळता येत होता. वैशाखाच्या मध्याला त्र्यंबक भागातील ढगांचे आगमन म्हणजे मॉन्सून चक्राचाच एक भाग होय. ढगांचे आगमन हवेतील उष्मा नाहीसा करते. उष्णतेची छोटीशी लाट येते व त्यानंतर लगेचच वळवाचा पाऊस होतो, हे इथले नित्याचे चक्र. पावसाचे आगमन आता दूर नाही, याची चाहूल ते देते. शहरी भागातही वेगवान वारे वाहत होते. त्यामुळे उन्हापासून संरक्षणासाठी लावलेली आच्छादने हेलकावत होती, तर गृहिणींना उन्हात ठेवलेले वाळवण उडून जाऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागत होती.
-----------
लाकूडफाट्याची लगबग
पाऊस महिना-पंधरा दिवसांत कोसळणार, याची चाहूल लागल्याने ग्रामीण आदिवासी भागात लाकूडफाटा गोळा करण्याची लगबग दिसून आली. त्र्यंबकच्या डोंगररांगावर फेरफटका मारला, तेव्हा अनेक खेडूत सहकुटुंब कुऱ्हाड, कोयते घेऊन गवत, लाकूड, कारवी कापून त्यांचे भारे तयार करण्यासाठी, वाळलेल्या गोवऱ्या गोळा करण्यासाठी डोंगरांकडे निघाल्याचे चित्र दिसत होते.
-----------
वळवाचा पाऊस आधी
या वर्षी ढगांचा मनोहारी प्रवास पौर्णिमेच्या काही दिवस अगोदरपासून सुरू झाला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वर परिसरात पौर्णिमेनंतर हमखास कोसळणारा वळवाचा पाऊसही दोन-एक दिवस अगोदरच कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे, असे येथील धार्मिक अभ्यासक राजेश दीक्षित यांनी सांगितले.

Thursday, August 2, 2007

Stadium turning into a grave yard!

In a way, this is encroachment; though technically the Stadium complex shopping center of Nashik is a sanctioned project.

I was a school child, when we use to play lots of games on the High School Ground, as it is called. Like me, this stadium has shaped many youths of Nashik.

Since last one and a half decade, the High School Ground is digging its owe crematory year by year, thanks to our political will, that has succeeded in transforming this last remaining open space into a grave.

The illegal owner of this place, the Zilla Parishad is inching towards transforming the High School Ground into a commercial place.

They have illegally shifted their departments in the stadium premises, where as court has clearly mentioned that that cannot any other activity on this ground except Sports.

ZP dose not possess capacity to run any kind of sporting activity on this prime land of Nashik. The spots associations of Nashik are not united to fight for the cause of sports in the stadium, nor they are strong enough to conduct sports training.

The stadium will turn into childrens grave yard!

What if a city transforming into metropolis, dose not have open space to nurture the young generation? The youth will be diverted towards crime, sex and indiscipline.

Tuesday, July 17, 2007

Should These Plants live...

सात हजार वृक्षांचे रोपण...
नाशिक - कुऱ्हाडीच्या घावांनी लक्षावधी वृक्ष जमिनदोस्त केल्याने जंगल म्हणावे अशी ठिकाणे अगदी मोजकीच शिल्लक राहिलीत. अशा मोजक्या जंगलांमध्ये बोरगड परिसराची गणना होत असुन इथल्या निसर्ग संपदेला ‘चार चांद’ लावण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासुन सुरु आहे. त्यात यंदा सुमारे सात हजार वृक्षांच्या रोपणाने भर पडली.
महिन्या, दिडमहिन्यांच्या पावसाने जवळपास सर्वच ठिकाणी डोंगर-दऱ्या हिरव्या शालुने नटुन थटुन उभ्या आहेत. नाशिकपासुन सुमारे 13 किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरगड परिसरातील हिरवी नवलाई मात्र सर्वांपेक्षा वेगळी म्हणायला हवी.


भारतीय वायुदलाने महत्वपूर्ण दळणवळण केंद्राच्या निमीत्ताने संपुर्ण बोरगड किल्ल्याचे अधिग्रहण केले आणि त्याच बरोबर बोरगडच्या परिसरात लोकांना ये-जा करण्यावर बंधने आलीत.


सेनादलाच्या या निर्बंधांमुळेच कदाचित बोरगडच्या निसर्गसंपदेला वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे गडाच्या पायथ्यालगतच्या तुंगलदरा ग्रामस्थांमध्ये वृक्षांबद्दल आस्था दिसुन येते, त्यामुळेच इथल्या जंगलात पक्षी व वन्यजीव केवळ स्थलांतरासाठी किंवा भक्ष्य शोधण्याकरिता येत नाहीत, तर प्रजननाकरिता सुद्धा येऊ लागल्याचे नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकच्या पाहणीत आढळून आले आहे.


बोरगड परिसरात वृक्ष वाढविणे हे जास्त सुरक्षीत असल्याचे मानुन नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकने गेल्या काही वर्षांपासुन बोरगड परिसरात निसर्ग संवर्धनेचे कार्य सुरु केले आहे.


यंदा महिंद्र ऍन्ड महिंद्र यांनी नेचर कन्झर्वेशन सोसायटी-नाशिकच्या प्रयत्नांना एक लाख वृक्ष लावण्याकरिता सक्रीय मदत करण्याचे मान्य केले असुन त्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी व रविवारी सुमारे 7000 वृक्षांचे रोपण करण्यात आले.


या वृक्षरोपण मोहिमेत महिंद्र ऍन्ड महिंद्र कंपनीच्या सुमारे साडे तीनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे तुंगलदरा येथील ग्रामस्थ, एअर फोर्स कॉलनी, तुंगलदरा व आशेवाडी, नाशिकच्या होरायझन ऍकॅडमी, सेंट लॉरेन्स शाळेच्या मुले व मुलींनी दोन दिवसात सातहजारहून अधिक वृक्षांचे रोपण केले.


बोरगड परिसरात दाट झाडी आहेच, त्यात काही मोकल्या भागात हे वृक्ष लावण्यात आले आहेत . आंबा, मोह, हिरडा, बेहडा, शिवण, खैर, जांभुळ, चिंच, बोर, आपटा, कांचन, अडूळसा, कवट इत्यादी स्थानिक वृक्षाची रोपांची लागवड करण्यात आली.


या मोहिमेत महिंद्र ऍन्ड महिंद्राच्या नाशिक प्लॅन्टचे उपाध्यक्ष विजय धोंगडे त्याच प्रमाणे एच.डी.आहेर, उदय वैद्य, विजय खानोलकर, सतिष गोगटे, गोविंद पित्रे, चंद्रकांत भांडे यांनी सहभाग घेतला.


वनविभागाने या मोहिमेला भरभरून सहाय्य केले. नाशिक सर्कलचे वनसंरक्षक व्ही.के.मोहन, उपवनसंरक्षक ए.एस. पाटील यांनी उपस्थित राहून वृक्षरोपणो महत्व विद्यार्थ्यांना विषद केले.


एन.सी.एस.एन.चे अध्यक्ष विश्वरूप राहा, सचिव नारायण भूरे, कुमुदिनी बंगेरा, अभिलाष बोटेकर, एस.बी.पाटील, अजित बर्जे, हेमंत आगाशे आदींनी सुमारे आठवडाभर या मोहिमेची तयारी करवुन घेतली. त्याच प्रमाणे वृक्षारोपणाकरिता सात हजाराहून अधिक खड्‌ड्यांची तयारी विविध यंत्रणांच्या मदतीने करून घेतली.

Monday, July 2, 2007

Journalist R threat for Prision security.....

तुरुंगाच्या सुरक्षेला पत्रकारांकडुन धोका?

2007-06-21

(प्रशांत परदेशी)

नाशिक - ‘नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेला पत्रकारांपासुन धोका पोहचु शकतो!’, हा कोण्या गुप्तचर खात्याचा अहवाल नाही, हा फतवा काढण्याचे महनिय कार्य केले आहे नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक अशोक राणे यांनी.

गुरूवारी सकाळी 11 वाजता नाशिकच्या व्यापारी व उद्योजकांच्या शिष्ट मंडळाने नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात चालणाऱ्या उद्योग धंद्याची माहिती जाणून घेण्याकरिता एका खास भेटीचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजच्या नाशिक शाखेच्या वतिने हा दौरा करण्यात आला होता. सोबत शहरातील काही व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

व्यापार उद्यम व प्रसिद्धी यांचे अतुट नाते आहे, त्यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना या पाहणी दौऱ्याची माहिती देऊन खास आमंत्रीत केले होते.

कारागृहातील नियमांची माहिती जाणून घेत 51 जणांचे शिष्ट मंडळ हातात लाल गुलाब पुष्प घेऊन मुख्य प्रवेश द्वारातुन आतल्या प्रवेश द्वारात सुरक्षेचे सर्व सोपस्कर पुर्ण करून दाखल झाले.

आता कारागृहात प्रवेश करणे बाकीच होते, तेव्हा एका पदाधिकाऱ्याने तुरूंग अधिक्षकांना तिघा पत्रकारांची ओळख करून दिली, तत्क्षणी लाल गुलाबाचे फुल देण्याकरिता पुढे सरसावलेले अशोक राणेंचे हात अचानक थबकले.

मी पत्रकारांना आत जाऊ देणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी कसं बसं गुलाबाचं फुल पत्रकारांच्या पुढे धरलं. त्यानंतर व्यापारी व उद्योजकांनी हे पत्रकार नेहमी व्यापार, उद्यामाशी संबंधित माहिती कव्हर करतात, असं सांगुन समजावण्याचा प्रयत्न केला.

सुमारे पंधरा ते वीस मिनीटे तुरूंग अधिक्षक व व्यापाऱ्यांचे शिष्ट मंडळ यांच्यात पत्रकारांना आत घेण्यावरून बातचीत सुरू होती, परंतु तुरूंगाची सुरक्षा महत्वाची आहे, असे निक्षून सांगत राणे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना आत नेताच येणार नाही, असा निर्धार बोलुन दाखवला.

ही चर्चा सुरू असताना पत्रकारही आपल्याला आत जाऊन उद्योग धंद्याची माहिती घेण्याची परवानगी मिळेल या उद्देशाने थांबुन राहिले होते, अखेर राणे यांनीच जवळ येऊन तुम्हाला सुरक्षेच्या कारणावरून आत जाता येणार नाही, असे सांगुन बाहेर जायला सांगितले.

एका महिला पत्रकारासह तिघा पत्रकारांनी राणेंना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले, त्यामुळे तिघा पत्रकारांवर रिकाम्या हातेने माघारी फिरण्याची पाळी आली.

नाशिक शहरातुन 8 किलो मीटरचा प्रवास करून आलेल्या तिघा पत्रकारांना रिकाम्या हाताने परतावे लागणार होते. शिवाय बातमी मिळू शकली नाही, असे वरिष्ठांना सांगावे लागणार होते. ये-जा करण्यात गेलेला दिड-दोन तासाचा मौल्यवान वेळ हा वेगळाच.

जाता जाता, महिला पत्रकाराने गांधिगीरी पद्धतीने निषेध नोंदविण्याकरिता पोलिसास गुलाब पुष्प देण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्षरश: पळ काढत या पोलिसाने गांधिगिरी निषेधही उधळून लावला.

http://www.nasikupdate.com/newsdet.php?msgid=1456&lang=M

राष्ट्रीय संपत्तीची हेळसांड ...


कसारा घाटाच्या अस्तित्वास आव्हान देणारी 'रोड ट्रेन'...
राष्ट्रीय संपत्तीची हेळसांड ...महामार्ग क्र.3चे दुय्यम स्थान!


-(प्रशांत परदेशी)
नाशिक (29/6/2007) - कसारा घाटातील किलो मीटर क्रमांक 471वर एक 'रोड ट्रेन' गेल्या 45 दिवसांपासुन पडुन आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कुतुहलाचा विषय ठरलेला हा अजस्त्र ट्रक म्हणजे घाटातुनच अवजड सामान वाहुन नेण्याच्या अट्टाहासाचा आदर्श नमुना असुन महामार्ग पोलिसांचे प्राण मात्र या रोड ट्रेनने अक्षरश: कंठाशी आणले आहेत.
इंग्रजी सिनेम्यात भरपुर चाके असणारे आणि भल्या मोकळ्या महामार्गावरून दिड-पावणे दोनशे किलो मीटर वेगाने धावणारे ट्रक बऱ्याचदा दृष्टीस पडतात. काही देशात असं भलं मोठं आकामान असलेल्या ट्रकला सेमी ट्रेलर ट्रक म्हणतात, तर काही देशात ट्रान्सफर ट्रक, 18 व्हीलर, बिग रीक, आर्टिक्युलेटेड लॉरी (आर्टिक) असेही संबोधतात.


इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंडमध्ये अशा महाकाय ट्रक्सला ट्रक व ट्रेलर म्हणतात, तर ब्रिटीश जगरनट असेही संबोधतात. अर्थात लोकसंख्या कमी आणि सुबत्ता जास्त, त्यामुळे विकसीत देशांतल्या महामार्गांना अशी अजस्त्र वाहने साजेशीच म्हणायला हवी. एकाच वेळी भरपूर माल किंवा अवजड वस्तु रस्त्याने वाहुन नेण्याचा या पेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही.


भारतीय रस्ते महाकाय आकाराच्या ट्रक ची ये-जा करण्याकरिता उपयुक्त आहेत? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच देता येईल. मेाजक्याच ठिकाणच्या रस्त्यांवरून 36, 40, 60, 80 किंवा 100 टायर्स असलेल्या अजस्त्र ट्रकवरून सामान किंवा अवजड वाहतुक केली जाऊ शकते, मात्र असं मोठ्ठ वाहन रस्त्यावरून धावत असेल तर वाहतुकीवर केवढा ताण निर्माण होईल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.


नाशिकमधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून असाच एक अजस्त्र ट्रेलर रस्ता पार करण्याकरिता आतुर झाला आहे. त्याकरिता या ट्रेलरला फक्त कसारा घाट चढून देशावर यावे लागेल इतकेच!


या ट्रकला केवळ 320 चाके आहेत! अबब! म्हणण्याची पाळी आणणाऱ्या हा अजस्त्र ट्रेलर तयार करण्यामागे एखादा विक्रम करण्याची मनिषा असावी की नाही, हे सांगता येणार नाही, परंतु हा अजस्त्र ट्रेलर कसारा घाटाच्या मध्यात येऊन थांबला आहे.


तसं घाटात आगमन होऊन त्यास 45 दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु महामार्ग पोलिसांकडून हिरवा कंदील मिळायला तयार नसल्याने या ट्रेलरची स्वारी एका छोट्या बायपासवर पार्क होऊन बसली आहे.


नासिक अपडेटने डोळे दिपवणाऱ्या या वाहनातुन काय नेण्याचं प्रयोजन आहे याची माहिती जाणून घेतली तेव्हा एकुणच प्रकार मती गुंग करणारा ठरला.


छत्तीसगडमधल्या सिपत येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्राचा वीज निर्मीती प्रकल्प आहे. या प्रकल्पात वीज निर्मीतीकरिता लागणारा एक महत्वाचा पार्ट खास रशियातुन तयार करून मागविण्यात आला.


जलमार्गे मुंबई जवळील बंदरात दाखल झालेल्या या पार्टचे वजन आहे फक्त 205टन आणि तो एका 150 टनी पुलओव्हरच्या मध्ये चपखल ठेवण्यात आला आहे.


एकुण 355 टनी भार छत्तीसगडपर्यंत कसा वाहुन न्यायचा याचा फारसा अभ्यास करण्यात आला नसावा. इटली व ऑस्ट्रेलियातील वाहतुक तज्ञांना या विषयी विचारणा करण्यात आली होती. या तज्ञांनी पाहणी केल्यानंतर कसारा घाटातुन हा ट्रेलर पास होणं अशक्यप्राय: असल्याचा अहवाल दिला होता.


अभ्यासु अहवालाकडे डोळेझाक करून जे.एम. बक्षी ऍन्ड कंपनीने डॉकमधुन हा अजस्त्र ट्रेलर थेट राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून दामटवला. 10 मे, 2007 रोजी घाटाच्या मध्यावर या ट्रेलरला छोटासा अपघात झाला, परंतु त्यामुळे घाटातली वाहतुक तब्बल 7 दिवस ठप्प झाली होती.


58 फुट लांबीचा हा ट्रेलर घाटातल्या अरूंद वळणावरून कसा दामटणार! याचे उत्तर ना जे एम बक्षी कंपनीकडे होते ना एनटीपीएस अधिकाऱ्यांकडे.


रशियाकडे तब्बल 150 कोटी रूपये मोजुन तयार करण्यात आलेला हा महत्वाचा काम्पोनंट सिपतच्या उर्जा प्रकल्पाकरिता तातडीने हवा आहे. तो कसारा मार्गे वाहुन नेणे शक्य नसल्याने महामार्ग पोलिसांचे उपआधिक्षक श्रीकांत जावळे यांनी हा डायनॉसॉर कसाबसा घाटात उलट्या दिशेने खालु उतरवला. या रोड ट्रेनला दोन्ही बाजुंनी रेल्वे प्रमाणेच इंजिन जोडून चालविण्याची सोय आहे.


जावळेंनी आता ही 'रोड ट्रेन' कसाऱ्यातुन जाणार नाही! असा पवित्रा घेतला आहे. देव न करो, परंतु जर ही रोड ट्रेन घाटात फसुन अपघात झाला तर तीन ते चार वर्ष घाटाची वाहतुक पूर्णपणे बंद होण्याचा गंभीर इशारा जावळेंनी दिला आहे. या इशाऱ्याकडे लक्ष देऊन हा ट्रेलर ठाणे, घोडबंदर मार्गे अहमदाबादहून उत्तर भारताकडे नेणे व्यवहार्य असताना एक तर प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने किंवा लांबच्या रस्त्यावरून अधिक खर्चिक होईल या हिशेबाने ही 'रोड ट्रेन' घाटातच पडुन आहे.


शुक्रवारी नासिक अपडेटने घाटात जाऊन 'रोड ट्रेन'ची पाहणी केली तेव्हा कंपनीचा एक अधिकारी वाहनाचे फोटो कशाला काढतात असे म्हणुन अंगावर धावुन आला. तसेच आपण पंजाबी असुन आपली खोपडी सरकली तर आपण काय करू शकतो याची आपणाला कल्पना नसल्याची धमकीच जे.एम. बक्षी कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली.


सार्वजनिक ठिकाणी अत्यंत महत्वाच्या मार्गावर वाहतुकीचा सात दिवस खेळखंडोबा करूनही या वाहतुक कंपनीचा आत्मा शांत झाला नसावा. पोलिसांवर राग व्यक्त करण्याऐवजी माध्यमाच्या प्रतिनिधींवर जे.एम. कंपनीचे अधिकारी राग व्यक्त करून मोकळे झाले.


'उचलली जीभ लावली टाळ्याला', या उक्ती प्रमाणे, 'उचलली ट्रक लावली कसाऱ्याच्या मार्गाला', असा वाहतुक कंपन्यांचा ग्रह झाला असुन राज्यकर्ते व सरकारी अधिकारी आपल्या खिशात असल्यागत वावरण्याच्या प्रवृत्तीतुनच राष्ट्रीय संपत्ती अशी धुळ खात पडुन राहीली आहे.


कसाऱ्यात पाऊस हा सदोदिसत सुरू असतो, त्यातच घाटात दरडी कोसळणे, खडक निखळणे, लहान मोठे अपघात सुरु असतात. या अपघात कैक किलोमीटरच्या रांगा लागुन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होतोच शिवाय प्रवाशांचे व वाहतुकदारांचे आतोनात हाल होतात.


राज्य सरकारने कसारा घाटातल्या वाहतुकीचे विशेष नियमन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अन्यथा चौपदरीकरण्याच्या फुटकळ प्रयत्नात अडकुन न राहता किमान आठपदरीकरणाची तसदी राज्यकर्त्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेणे गरजेचे आहे. ही तसदी घेतली गेली नाही, तर मात्र घाटात वाहतुक फसुन कोट्यावधी रूपयांचा चुराडा होईलच शिवाय लोकांना आतोनात हाल आपेष्टांना सामोरे जावे लागेल. लाल दिव्यातुन प्रवास करणारे याचा गांभीर्याने विचार करतील का?

http://www.nasikupdate.com/newsdet.php?msgid=1492&lang=M

Friday, June 22, 2007

What happened to this Giant Turtle...


नाशकात महाकाय आकाराच्या कासवाची विक्रीची चर्चा...
मत्स ठेकेदाराने आंबोली धरणात केले कासवाचे हाल!


(प्रशांत परदेशी)नाशिक - नाशिक शहरात एका महाकाय आकाराच्या दुर्मिळ कासवाची विक्री करण्यात आल्याचे वृत्त असुन कासव पकडणाऱ्या एका मत्स ठेकेदाराने मोठ्या रकमेच्या बदल्यात कासवाची विक्री केल्याची जोरदार चर्चा आहे. वन अधिकाऱ्यांनी मात्र ठेकेदाराने कासव पाण्यात परत सोडुन दिल्याची माहिती नाशिक अपडेटला दिली.
त्र्यंबकेश्वर पासुन 5 किलो मिटर अंतरावर वाघेरा किल्ल्याच्या पायथ्यालगत आंबोली गावापासुन काहीशा आडोशाला असलेल्या या धरणात रौशन सिंग हा मत्स ठेकेदार गेल्या अनेक वषार्ंपासुन मासे पकडण्याचे काम करत आहे, त्यामुळे धरण परिसरात या रौशन सिंगची बरीच चलती आहे. रौशन सिंगने काही स्थानिकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
- The giant turtle spotted at the Amboli dam according to forest officials is a schedule 1 animal. Their highly domed shell suggest that this is not a turtle of swift currents so they probably do not inhabit the main channels of large rivers on a regular basis.
सायंकाळी नासिक अपडेटने वन कार्यालयात जाऊन श्री. कापसे यांची भेट घेतली तेव्हा, रौशन सिंग याने कासव पाण्यात सोडुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. ‘रौशन सिंगने आपल्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला होता, आपल्या एका कर्मचाऱ्याचे बोट या कासवाने तोडल्याचे व कासव काही गावकऱ्यांचा जबाब नोंदवुन आपण पाण्यात सोडुन दिले ’, अशी माहिती कापसे यांनी दिली.
मंगळवारी नासिक अपडेटने आंबोली धरणात साठ ते सत्तर किलो वजनाचे महाकाय कासव आढळल्याची उद्‌घोषणा आपल्या साईटवरून प्रसारीत केली होत.बुधवारी प्रत्यक्ष आंबोली येथे भेट दिली तेव्हा ग्रामस्थांनी कासवाची माहिती कथन केली. ठेकेदार रौशन सिंग यांचा मासेमारीचा ठेका असल्याने त्यांचा व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा धरणाच्या परिसरात वावर असतो.
धरणाच्या एका खांबाला सुमारे चार फुटाचे महाकाय कासव गेल्या तीन दिवसांपासुन बांधुन ठेवण्यात आल्याची माहिती एका ग्रामस्थाने नासिक अपडेटला दिली. कासवाचे पाय चहुबाजुंनी दोरखंडाने करकचुन बांधुन ठेल्याची आपण बघितले, असे गावकरी सांगत होते.

- A Local resident from Amboli identifies the spot, where a large size turtle was tied for three days. (Pic: Prashant Pardeshi)
पर्यावरणाची तमा न बाळगता खालावलेल्या जलस्तरात मासे मारी कशी काय केली जाऊ शकते. मत्स खात्याचा किंवा पाटबंधारी, जलसंपदा, पर्यावरण आदी खात्यांचा अशा निर्दयी व निष्ठुर उद्योगाला कोणतेही नियम नाहीत का? असे असंख्य प्रश्या या निमीत्ताने उपस्थित होत आहे.
- The water level at Amboli dam has reduced at its lowest ebb, causing enormous danger to the water bodies and species. The contractor on the other hand appears to be unbothered about the ecological effects. (Pic: Prashant Pardeshi)
नासिक अपडेटने ठेकेदार रौशन सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा दुरध्वनी बंद केल्याचा संदेश सतत येत होते.
महाकाय आकाराचे कासव ठेकेदाराने खरोखरीच धरणात सोडुन दिले असेल तर ती भाग्याची गोष्ट म्हणायला हवी, अन्यथा अशा दुर्मिळ प्राण्याची तस्करी शहर किंवा जिल्ह्याबाहेर होऊ नये याकरिता प्रशाकीय यंत्रणांनी नाकाबंदी करणे गरजेचे आहे.

http://www.nasikupdate.com/newsdet.php?msgid=1452&lang=M

Thursday, June 14, 2007

press purpose

Often rated as fourth pillar of DEMOCRACY,
press is and will contineu to play important role
in the society.

- How is todays press?
- will it safe guard the escense of Demorcacy?
- Is freedom of press a real issue?
- Can it serve for equality and upliftment of downtrodden masses?
- What about the treansprency of press in third world nations?
-------------determined to outsepak critical issues--------------

Sections//=under construction.